


✒️भद्रावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.3मार्च):- गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला ग्रामरोजगार सेवकांचा संप व ग्रामसेवक यांनी रोहयो चे कामात झटकलेली जबाबदारी. यामुळे मजुरांना कामाची गरज असुनही ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरू झाले नसल्याने भद्रावती तालुक्यातील वडाळा( तु) येथील मजुरांनी कायद्यातील तरतुदी नुसार रोहयो यंत्रणेला गावात काम सुरू करण्यास भाग पाडुन १०४ मजुरांना काम मिळाले.
सविस्तर वृत असे की, शेतीचा खरीप हंगाम संपताच दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची गरज असते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरू झाले. जानेवारी महीण्यापासुंन ग्रामरोजगार सेवक संपावर गेले. त्यातल्यात्यात ग्रामसेवक यांनी सुध्दा रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यासाठी हात वर केले. त्यामुळे चालु झालेले काम बंद करण्यात आले. मात्र दोन महीणे होऊन सुद्धा रोजगार हमी चे काम सुरू केले नसल्यानें अखेर मजुरांनी रोजगार हमी कायद्याचा अभ्यास करुन त्यातील तरतुदीनुसार “मागेल त्याला काम” हे सुत्र लक्षात घेऊन २०/२/२०२३ पासुन काम मिळण्यासाठी ग्रामसेवक यांचेकडे दिनांक १६/०२/२०२३ रोजी १०४ मजुरांनी नमुना ४ चा अर्ज देऊन त्याची ग्रामसेवक यांचेकडून नमुना ५ ची पोचपावती घेतली.
रोजगार हमी कायदा नुसार मजुरांनी काम मागणी केल्यापासून १५ दिवसाचे आत मजुरांना काम उपलब्ध करून दिले नाही तर मजुरांना बेरोजगार भत्ता द्यावा लागतो. त्यामुळे ग्रामसेवक यांनी दिनांक २८/२/२०२३ पासुन सईबाई बापुराव केराम यांचे शेतात मजगीचे कामाला जाण्याचा आदेश नमुना ७ दिनांक २५/२/२०२३ काढुन काम उपलब्ध करून देण्यात आले. कायद्यानुसार हक्काचे काम मिळण्यासाठी फिड फाउंडेशन महाराष्ट्र तथा पर्यावरण मित्रचे शंकर भरडे व सामाजिक कार्यकर्ते माधव जिवतोडे यांचे मार्गदर्शनाखाली रोहयो मजुरांचे प्रतिनिधी मारोती भरडे, देवराव जिवतोडे, मंगेश कारमेंगे, श्रीकांत गजभे, वासुदेव उईके, अमोल शेंडे यांनी परिश्रम घेतले. कायद्यानुसार मजुरांना काम वेळेत काम उपलब्ध करून दिल्याबद्दल रोहयो यंत्रणेतील सर्वांचे रोजगार हमी संघटना वडाळा तु.चे वतीने अभिनंदन करण्यात आले.













