


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड(सातारा ) : मौजे. आंधळी ता. माण, जि. सातारा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियांना अंतर्गत ग्रामपंचायत आधंळी व आरोग्य विभाग पंचायत समिती (माण) यांचा संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत आंधळी याठिकाणी ऑनिमिया मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.
भारतात ॲनिमिया (अशक्तपणा) हा एक महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. लोहाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये संरचनात्मक विकास बिघडतो आणि प्रौढांमध्ये काम करण्याची क्षमता कमी होते. बाल्यावस्थेत आणि बालपणात त्याचे परिणाम सर्वात गंभीर असतात. गरोदरपणात, लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणामुळे प्रसूतीपूर्व बाळांचे नुकसान, अकाली जन्म आणि कमी वजन (LBW) बाळांना त्रास होऊ शकतो. मजबूत संस्थात्मक यंत्रणेद्वारे सहा हस्तक्षेपांच्या अंमलबजावणीद्वारे सहा लाभार्थी वयोगटातील मुले (६-५९ महिने), मुले (५-९ वर्षे), किशोरवयीन मुले (१०-१९ वर्षे), गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला आणि पुनरुत्पादक वयोगटातील महिला (१५-४९ वर्षे) यांच्या जीवनचक्रात रक्तक्षय कमी करण्यासाठी ॲनिमिया (अशक्तपणा) भारत अभियाना अंतर्गत गावातील महिला, पुरुष २६१ लोकांचे शुगर बीपी व बालकांची ऑनिमीया टेस्ट करण्यात आली. तसेच ॲनिमिया (अशक्तपणा) वर मात करण्यासाठी गाव सशक्त आणि सुदृढ करण्याच्या उद्देशाने विशेष आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गावातील महिला, बालकांना आरोग्य विषयक सल्ला व माहिती देऊन ॲनिमिया (अशक्तपणा) मुक्त भारताकडे कडे गावाने एक मोलाचं पाऊल टाकले..
यावेळी माण तालुक्याचे मा. तहसीलदार- सचिन अहिर साहेब, अर्जुन (तात्या) काळे, मा. मंडल अधिकारी-विजय जाधव, तलाठी- सुमित मिसाळ, सरपंच- मा. दादासाहेब काळे, ग्रामविकास अधिकारी- विकास गायकवाड, शिवाजी काळे, अभिजित भोसले, सविता खरात, जयश्री चव्हाण, अश्विनी माने, सुधाकर काळे, संजय काळे, संतोष काळे, तानाजी काळे, बापूराव काळे, घनश्याम काळे, मगर सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामस्थ
व आदी मान्यवर उपस्थित होते..














