(भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा)
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 2 जानेवारी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर 205 वा भीमा कोरेगाव शौर्य दिन दादासाहेब शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दादासाहेब शेळके हे बोलत असतांना ते म्हणाले की, काही समाजकंटक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या परिस्थितीमध्ये सुरू केले आहे यामध्ये सरकारही शामिल आहे.
कारण करणी सेना चा अध्यक्ष अजय शेंगर याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदना मार्फत भीमा कोरेगाव येथील शुरवीर 500 महारांचा इतिहास असलेला विजयस्तंभ हा बुलडोजर लावून पाडण्याची मागणी केली आहे.
या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री यांनी स्वीकारून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.
असा घणाघाती आरोप शेळके यांनी यावेळी केला आहे. ते पुढे म्हणाले की, आता बौद्ध समाजाने जागृत होऊन, संघटित होऊन समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज आहे.
आणि अजय शेंगर यांच्या वक्तव्याचे भिम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके यांनी जाहीर तीव्र निषेध केला आहे.
यावेळी तालुक्यात एक डॅशिंग नेतृत्व व युवा पत्रकार म्हणून समाजाच्या अडीअडचणीला कामी पडणारे भिम टायगर सेना शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, श्यामभाऊ धुळे (जिल्हाकार्याध्यक्ष भिम टायगर सेना), एड. पंजाबराव नवसागरे साहेब, मेजर संभाजी पाईकराव, सिद्धार्थ बरडे (रिपाई तालुकाअध्यक्ष),
कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतिदूत समिती), कैलास घुगरे (पत्रकार), सुमेध नवसागरे (ग्रामपंचायत सदस्य), आकाश श्रवले, अमोल दिवेकर, बडेराव सर असे अनेक भीम अनुयायी, तरुण मंडळी व समाज बांधव उपस्थित होते.