घेऊन या समाज परिवर्तनाचा ध्यास
त्यांनी पत्रकारितेमध्ये पाऊल ठेवले होते
नवनाथ आडे पत्रकार हे नाव ऐकताच
बेकादेशीर धंदे करणारे नतमस्तक झाले होते…..
दिव्यांग असून सुद्धा सक्षम आहेत
गुन्हेगारी विरुद्ध ठामपणे लिहिण्याकरिता
निर्भीड पत्रकाराची ताकद काय असते?
हे गुन्हेगारांना दाखविण्याकरिता …..
पत्रकारांना म्हणतात लोकशाहीचा आधारस्तंभ
म्हणून लेखणी ही तलवारी सारखी असते
वार केल्यानंतर रक्त तर सांडत नाही
पण खोलवर घाव घालण्याची ताकद असते…..
तुमच्यासारख्या तरुण पत्रकारांची
खरंच गरज आहे या भारत देशाला
तुमच्या लेखणीने असे कार्य घडावे
तोडला माणसांची माणसांशी असलेल्या द्वेशाला…
शेवटी अशीच करेल ईश्वरचरणी प्रार्थना
गंज लागू नये तुमच्या पवित्र अशा लेखणीला
तुमच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाची
गरज आहे माझ्या या पवित्र भारतभूमीला…..
✒️काव्यप्रेमी:-स्वप्नील गोरे