


✍️ शार्दुल पचारेे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर दि.६ : शंकरपुर मार्गावरील पुयारदंड येथून गोठ्नगावकडे रस्त्यावर माती टाकल्याने या मार्गाची – दुरवस्था झाली असून न हा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे त्यामुळे पावसाळ्यात – अपघाताची शक्यता बळावली न आहे. या रस्त्याची काही ठिकाणी संपूर्ण चाळण झाली आहे. – खड्यामध्ये पाणी साचत आहे. व रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे – पावसाचे पाणी पडून चिखलाचे र साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकी चालकांना न वाहन चालवताना तारेवरची कस- रत करावी लागत आहे. या
मार्गाच्या डामबरीकरणा करीता कंत्राट दिले आहे मात्र मागील कित्येक दिवसापासून कंत्राटदारा- कडून धीम्या गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील अपूर्ण पुलामुळे शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ताबडतोब या रोडचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत














