Home अमरावती कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी जिद्द व सातत्य आवश्यक- दिलीपबाबू इंगोले

कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी जिद्द व सातत्य आवश्यक- दिलीपबाबू इंगोले

163

▪️” शिक्षक साहित्य संमेलनात जयदीप सोनखासकर यांनी मा. दिलीपबाबू इंगोलेंशी साधला मुक्तसंवाद ”      

▪️दिलीपबाबू इंगोले यांचा मुक्तसंवाद ऐकून रसिक झाले मंत्रमुग्ध 

▪️साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी साधला रसिकांमधून मुक्तसंवाद 

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.24जानेवारी):-महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्राप्त,श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष, समाजसेवी मा.दिलीपबाबू इंगोले यांच्याशी क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबाबत मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर यांनी मुक्तसंवाद साधला. 

         जयदीप सोनखासकर यांनी बालपणापासून तर आजच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षपदापर्यंतचा पूर्ण प्रवास मा.दिलीपबाबू इंगोले यांना प्रश्नाच्या रूपात विचारल्यानंतर मा.दिलीपबाबू इंगोले यांनी त्यांच्या प्रश्नाची अतिशय समर्पक उत्तरे देऊन खेळीमेळीच्या आणि आनंददायी वातावरणात मुक्तसंवाद साधला.

        आपण या मानाच्या क्रीडा पुरस्कारापर्यंत कसे पोहोचू शकले ? या जयदीप 

सोनखासकर यांनी 

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरा प्रसंगी मुक्तसंवाद साधताना मा.दिलीपबाबू म्हणाले की, “कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

       कोणत्याही क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कशाची आवश्यकता आहे? असे जयदीप सोनखासकर यांनी विचारले असता मा.दिलीपबाबू इंगोले म्हणाले की,”कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी जिद्द, सातत्य,शिस्त महत्त्वाची असते.”

        जयदीप सोनखासकर यांनी, “आजच्या तरुण खेळाडूंना काय सांगाल ?” असा प्रश्न विचारला असता मा. दिलीपबाबूंनी सांगितले की, “शॉर्टकटने यश मिळत नाही. मैदानात घाम गाळल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही. अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा उभे राहणे हाच खिलाडूवृत्तीचा खरा विजय आहे.”

       आपण श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष आहात.या संस्थेच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यामागे आपली प्रेरणा काय होती?” , ​”शिक्षण क्षेत्रातील आर्थिक व्यवस्थापन इतर क्षेत्रांपेक्षा कसे वेगळे वाटते?” , ​”संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget) तयार करताना आपण कोणत्या मुख्य गोष्टींना प्राधान्य देता?”,”निधीचा (Funds) विनियोग शैक्षणिक गुणवत्तेसाठी योग्य प्रकारे होत आहे, हे तुम्ही कसे निश्चित करता?”, ​”संस्थेला मिळणाऱ्या देणग्या किंवा सरकारी अनुदानाचे व्यवस्थापन करताना तुमच्यासमोर कोणती आव्हाने येतात? या जयदीप सोनखासकर यांनी विचारलेल्या कोषाध्यक्ष पदासंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना दिलीपबाबू इंगोले यांनी अतिशय समर्पक आणि मुद्देसूद मुक्तसंवाद साधला. मा.दिलीप बाबूंची उत्तरे ऐकून रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.

     मा.दिलीपबाबू इंगोले यांच्याशी त्यांच्या सामाजिक कार्याविषयी जयदीप सोनखासकर यांनी साधलेला मुक्तसंवादही वैशिष्ट्यपूर्ण राहिला. विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या दुःखद असून युवा शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदे करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

      मुक्तसंवादाच्या अंतिम टप्प्यावर प्रश्न विचारण्यासाठी मा.सोनखासकर यांनी रसिकांना जेव्हा आवाहन केले, तेव्हा रसिकांमधून एक प्रश्न मा.दिलीप बाबूंना विचारण्यात आला. साहित्यिक शिवसेवक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले रसिकांमधून प्रश्न विचारताना म्हणाले की ,”श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थ्यातून आदर्श नागरिक घडले पाहिजे, मानवता धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे हे डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे स्वप्न साकार होताना आपल्याला दिसत आहे का ? यासाठी संस्था शाळा – महाविद्यालयातून कोणकोणते प्रकल्प आणि उपक्रम राबवित आहे ?” शिवसेवक प्रा.बुंदेले यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना मा.दिलीप बाबूंनी अतिशय उत्तम आणि समाधानकारक मुक्तसंवाद साधला.

        या मुक्तसंवाद कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण, प्राचार्य डॉ. विनय राऊत, प्रा.डॉ.पृथ्वीराज सिंह राजपूत, अभंगकार प्रा.अरुण बुंदेले, शरदचंद्र बिडकर,प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे होते.सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते.

         कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ.मंदा नांदुरकर तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले. साधला.

        या मुक्तसंवाद कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण, प्राचार्य डॉ. विनय राऊत, प्रा.डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत,

अभंगकार प्रा.अरुण बुंदेले, शरदचंद्र बिडकर, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे होते.सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते.

         कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ.मंदा नांदुरकर तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here