


नाशिक शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: येवला तालुक्यातील ग्रामीण भागात ऐन सायंकाळी वाडीवस्तीवरील वीज पुरवठा खंडित केला जातो.त्या अनुषंगाने मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी येवला तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येवला तालुका ग्रामीण विभागाचे महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी आदरणीय जाधव यांना लेखी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मच्छिंद्र भाऊ जाधव, विलास दरगुडे, दिगंबर दौंडे शिवाजी भोसले, संपत खैरनार, प्रकाश सोनवणे, सुकलाल खाडे, विठ्ठल गागरे, सागर जाधव, बाळासाहेब जाधव, लक्ष्मण खाडे, अनिल थोरात रवींद्र सोनवणे, सुनील सोनवणे, राजेंद्र जाधव, अनिल गवंडी, साहेबराव लबडे, बाबासाहेब भड, सुखदेव मोरे, दिनेश दराडे, किसान भड, अनिल नाना गवंडी, गणपत कांदळकर कानडी आदी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.














