


✒️बाळासाहेब ढोले(पुसद-यवतमाळ,प्रतिनिधी)मो:-7875157855
पुसद(दि.7जानेवारी):-संभाजी नगर येथील नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांची भेट घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन (बौद्ध विहार) च्या राहिलेल्या सौदर्यीकरण व शिल्लक काम हे मागील २० ते २५ वर्षे पासून बाकी आहे.
सदरील काम हे आमदार निधी मधील असून नगर परिषद पुसद कडे होते मात्र तेव्हा पासूनच काम संथगतीने झाले असून आजतागायत बाकीच आहे सदरील काम हे त्वरीत सुरू करावे करिता येथील सामाजीक कायकर्ते रंगनाथ धिरे व येथील महिला मंडळ यांनी मागणीचे निवेदन राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या पत्नी अँड मोहीनीताई नाईक यांनी ते निवेदन स्विकारून काम लवकरात लवकर राहिलेले काम पुर्ण करून देण्याची ग्वाही दिली.














