Home नागपूर बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण दृष्टिकोन बाळगून उत्कृष्ट प्रतीचे कार्य करा-केंद्रीय रस्ते वाहतूक...

बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण दृष्टिकोन बाळगून उत्कृष्ट प्रतीचे कार्य करा-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

144

 

नागपूर (12 सप्टेंबर)-बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्ता पूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी बांधकाम खर्चामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच किफायतशील बांधकाम सामग्रीचा वापर करून गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता चांगले बांधकाम करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर, इंदोरा येथे आयोजित इंडियन बिल्डिंग काँग्रेस-आयबीसीच्या वार्षिक सभेला तसेच राष्ट्रीय परिसंवादाप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, आयबीसी चे अध्यक्ष सी देबनाथ प्रामुख्याने उपस्थित होते .

इंडियन रोड काँग्रेसच्याच धरतीवर इंडियन बिल्डिंग काँग्रेसचे एक कार्यालय स्थापन करून त्यामध्ये निरंतर संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून गुणवत्तापूर्ण आणि दर्जात्मक संशोधन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
बांधकाम क्षेत्रात चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे असे सांगताना गडकरी यांनी, जे अधिकारी कामकाजात हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा देखील इशारा दिला.

कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये लँडस्केपिंग, पर्यावरण पूरक बांधकाम, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा असल्या पाहिजे. त्याचबरोबर जलसंधारणा करिता तसेच सांडपाणी व्यवस्थापनाकरिता देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले .

याप्रसंगी इंडियन बिल्डिंग काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी या इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक अहवालाचे देखील प्रकाशन केले तसेच गुणवंत अभियंतांचा तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

इंडियन बिल्डिंग काँग्रेस ही प्रशासक, वित्तपुरवठादार, नियोजक, वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते, सार्वजनिक आरोग्य अभियंते, विद्युत अभियंते, ऊर्जा अभियंते, यांत्रिक अभियंते, पर्यावरणशास्त्रज्ञ, बागायतदार, बांधकाम साहित्याचे उत्पादक, संशोधक, शिक्षक इत्यादी संबंधित सर्व व्यावसायिकांना एकाच मंचावर एकत्र आणून देशात शाश्वत बांधकाम तसेच निर्मितीसाठी काम करणारी एक संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून यावर्षी वार्षिक सभेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here