Home लेख बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे : एक समर्पित व्यक्तिमत्व

बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे : एक समर्पित व्यक्तिमत्व

51

 

 

प्रभाकर सोमकुवर, नागपूर
दुरध्वनी क्र : 9595255952

 

 

ज्यांच्या खांद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मिशनची पायाभरणी मोठ्या आत्मविश्वासाने दिली आणि ज्यांनी आयुष्यभर मिशनसाठी स्वतःला झोकून दिले. त्या आंबेडकरवादी, दलितांचे नेते, कामगारांचे हितचिंतक आणि खासदार आदरणीय बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी सघन कुटुंबात जन्म घेऊनही लहानपणापासूनच समाजसेवेच्या क्षेत्रात उडी घेतली. बॅरिस्टर झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विनंतीवरून ते समाजकार्यात उतरले आणि शेवटपर्यंत समाजसेवा करत राहिले.

*खंदे नेतृत्व*
या देशात समता, न्याय आणि बंधुत्वाचे राज्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने राजकीय सत्ता हाती घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या अनुसूचित जाती महासंघाचे ते सरचिटणीस होते आणि नंतर ते रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसीडियमचे अध्यक्ष होते. रिपब्लिकन पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर ते शेवटपर्यंत एकाच गटाचे (खोरिपा) अध्यक्ष राहिले. पक्षाच्या फुटीमुळे त्यांना खूप दु:ख झाले होते, तरीही ते पक्षाचे नेतृत्व करतांना कधीही डगमगले नाही, वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी त्वरीत संपूर्ण समाजाचा विश्वास संपादन केला आणि सर्वजण त्यांच्या सोबत आलीत.

*आंदोलनकारी नेता*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात जी काही चळवळ सुरू केली. राजाभाऊ खोब्रागडे नेहमीच त्यांच्यासोबत राहिले. 1965 मध्ये भूमिहीनांना जमीन देण्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू केले गेले, ज्यामुळे सत्तेत असलेल्यांमध्ये घबराट निर्माण झाली. ते यशस्वी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या चळवळीने जनमानसावर अमिट छाप सोडली. या नंतरही त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तत्वधानात अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. मंडल आयोग लागू करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम चळवळ सुरू केली आणि दलितही त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनीच बहुजनांना दिली.

*कामगारांचे हितचिंतक*
बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे कामगारांचे खरे हितचिंतक मानले जात होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली ‘डिमोक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियन’ कामगारांच्या हक्कांबाबत त्यांना किती आस्था होती हे दर्शविते. डेमोक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियनच्या कामगारांना संबोधित करताना ते म्हणाले होते की, त्यांनी असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करावा. त्यांचा विडी कामगारांवर विशेष विश्वास होता.

*लोकशाही के पुरस्कर्ता*
माननीय बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे लोकशाहीचे कट्टर समर्थक होते. ते म्हणाले की, लोकशाहीतच अत्याचारित दलित, आदिवासी आदी उपेक्षितांना त्यांच्या प्रगतीची संधी मिळू शकते. नोटबंदीला विरोध करून त्यांनी लोकशाही प्रती आपली कट्टर निष्ठा दाखवून दिली. लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विरोधकांना एका झेंड्याखाली आणण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न सुरूच होते. ते विरोधकांच्या ऐक्याचे शिल्पकार मानले जात होते.

*सच्चा देशभक्त*
दलितांवर होत असलेल्या अगणित अत्याचारांना कंटाळून काही लोकांनी दलितस्थानाची मागणी सुरू केली. पण बॅरिस्टर साहेबांनी त्याला कडाडून विरोध केला. हा देश आमचा असून आम्ही येथील मूळ रहिवासी आहोत, असे ते म्हणाले. येथे दलित, शोषित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दलिस्थानाची मागणी रास्त नाही. या देशात राहून आपण आपली मागणी पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे ते भारताच्या अखंडतेच्या बाजूने राहिले आणि यावरून त्यांची खरी देशभक्त म्हणून ओळख दिसून येते.
आजपासुन त्यांची जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. त्यानिमीत्त त्यांच्या पावन स्मृतीस मानाचा मुजरा !

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here