दिव्यांगाना शासनाकडुन पंधराशे रुपये मानधन दिले जातो परंतु मिळणारे मानधन दिव्यांगाना वेऴेवर मिऴत नसल्याने त्यांचे कामे वेऴेवर होत नाही त्यामुळे युवक कॉंग्रेस कार्यकर्ते शुभम विजय गजभिये यांनी शासनाकडे मागणी केली आहे. समाजातील शेवटचा घटक म्हणजे दिव्यांग आहे तो अत्यंत हलाखीचे परिस्थिति मधे जीवन जगत असुन आणि शासना कडुन तुटपुंजे मानधन मिऴत असुन तें ही दोन तीन महिने मिऴत नाही.शासनाने आता मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना राबविली असुन लाडकी बहिन यांना पंधराशे रूपये मानधन देत आहे तेंही एका महिने मधे दोन महिने चे एकत्रित हप्ता टाकत असुन मात्र आमचे दिव्यांग बांधवांना मात्र तीन तीन महीने मानधन येत नाही ते नियमित वेऴेवर दयावे व जिल्ह्यातील दिंव्यागांची दखल घ्यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मधील दिव्यांग बांधव करित आहेत