Home लेख राईट मॅन इन राँग पार्टी! ( कविवर्य अटल बिहारी वाजपेई पुण्यस्मरण...

राईट मॅन इन राँग पार्टी! ( कविवर्य अटल बिहारी वाजपेई पुण्यस्मरण विशेष.)

112

 

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात ‘गुड गवर्नेस डे’ अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले. सन २०१४सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी गुड गवर्नेंस डे साजरा करण्याची घोषणा केली होती. भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी हा दिवस सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करून दिला जातो.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. दि.२७ मार्च २०१५ला त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना राईट मॅन इन राँग पार्टी असे म्हटले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती दरवर्षी २५ डिसेंबरला साजरी केली जाते. ते एक महान नेते असण्यासोबतच उत्कृष्ट कवी देखील होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दि.२५ डिसेंबर १९२४ ला मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आईचे नाव श्रीकृष्णादेवी होते. कृष्ण बिहारी वाजपेयी हे त्यांच्या गावातील एक प्रसिद्ध कवी आणि शिक्षक होते. अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्या सात भावडांपैकी एक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण ग्वालियरच्या गोरखी गावातील गवर्नमेंट स्कूल मधून पूर्ण केले. पुढील शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते ग्वालियरच्या व्हिक्टोरिया कॉलेज (आता लक्ष्मीबाई कॉलेज) आणि कानपूरच्या डीएवी. कॉलेजला गेले. या कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन आणि अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी लखनऊच्या लॉ कॉलेजमध्ये आवेदन केले, परंतु पुढील शिक्षणात त्यांचे चित्त लागले नाही. यानंतर त्यांनी आरएसएस द्वारे प्रकाशित एका मासिकात संपादकाचे काम सुरू केले. त्यांनी आपल्या जीवन काळात विवाह केला नाही, परंतु त्यांनी प्रोफेसर बीएन.कौल यांच्या दोन मुली नमिता आणि नंदिता यांना दत्तक घेतले. नंतरच्या काळात त्यांनी अनेक हिंदी वृत्तपत्रात संपादक म्हणून कार्य केले.
वाजपेयी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून झाली. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या इतर नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. या दरम्यान त्यांची भेट भारतीय जनसंघाचे प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झाली. यानंतर त्यांनी मुखर्जीं सोबत राजनीतीचे अनेक डावपेच शिकायला सुरुवात केली व त्यांच्या राजकीय कार्यात सहयोग करणे देखील सुरू केले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वास्थ खराब होते. शारीरिक समस्येमुळे लवकरच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर बीजेस.पक्षाची जबाबदारी वाजपेयी यांनी सांभाळली. यांच्या विचारांनी पक्षाचा अजेंडा पुढे सुरू राहिला.
सन १९५४मध्ये ते पहिल्यांदा बलरामपुर सीट वरून संसदेचे सदस्यांमधील निवडले गेले. तरुण वयात त्यांचे विस्तृत विचार आणि राजकीय माहितीमुळे त्यांना राजनीतिच्या जगात विशेष सन्मान मिळाला. सन १९७७मध्ये जेव्हा मोरारजी देसाई यांचे शासन आले, तेव्हा वाजपेयी यांना विदेश मंत्री बनवण्यात आले. दोन वर्षानंतर त्यांनी चीन सोबत असलेल्या भारताच्या संबंधांवर चर्चा केली. भारत पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धानंतर पुन्हा एकदा भारत पाकिस्तानचे व्यापारिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची यात्रा केली. सन १९७९मध्ये त्यांनी जनता पक्षाच्या मंत्री पदावरून राजीनामा दिला व सन १९८०मध्ये त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत मिळून आपला स्वतःचा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचा पाया घातला. स्थापनेच्या नंतर ५ वर्षे वाजपेयी या पक्षाचे अध्यक्ष राहिले. सन १९९६च्या लोकसभा निवडणुकीत बीजेपीला सत्तेत येण्याची संधी प्राप्त झाली. भारतीय जनता पक्षातर्फे अटल बिहारी वाजपेयी यांना देशाचे पंतप्रधान बनविण्यात आले. परंतु बीजेपीच्या सहयोगी दलांकडून त्यांना समर्थन मिळाले नाही. परिणामी बहुमत सिद्ध न झाल्याने फक्त तेरा दिवसात हे शासन पडले. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदावरून राजीनामा दिला. यानंतर बीजेपीने इतर पक्षांसोबत मिळून नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स- एनडीएची स्थापना केली. सन १९९८ साली बीजेपी पुन्हा सत्तेत आली. परंतु यावेळी देखील त्यांची सत्ता तेरा महिने राहिली. वाजपेयी यांच्या या कालावधीत भारत परमाणु शक्तीने सज्ज राष्ट्र बनले. त्यांनी पाकिस्तानसोबत कश्मीर मुद्द्यावर अनेक चर्चा करून विवाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकिय षडयंत्रामुळे फक्त तेरा महिन्यानंतर एका मताच्या अभावाने त्यांचे शासन पडले. यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपती यांना त्याग पत्र देऊन आपल्या भाषणात म्हटले, “सत्तेचा खेळ तर सुरू राहील, अनेक सरकारे येतील जातील.
परंतु हा देश आणि या देशाचे लोकतंत्र नेहमी अमर राहायला हवे. ज्या शासनाला वाचवण्यासाठी असंविधानिक पाऊल उचलावे लागतील, त्या शासनाला चिमट्यानेही स्पर्श करणे मला पसंद नाही.” यानंतर १९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताच्या विजयानंतर वाजपेयी यांचे सरकार अधिकच बळकट झाले. नंतरच्या निवडणुकीत बीजेपीला जनतेने पुन्हा एकदा निवडून दिले. यानंतर अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. यावेळी वाजपेयी यांनी पूर्ण पाच वर्षे शासन केले आणि पाच वर्षे यशस्वी शासन चालवणारे ते पहिले गैर काँग्रेसी सरकार होते. सर्व पक्षांच्या निर्णयानंतर वाजपेयी यांनी देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी कार्य सुरू केले. त्यांनी नॅशनल हायवे डेवलपमेंट प्रोजेक्ट व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. खाजगी क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. औद्योगिक क्षेत्रात निवेश च्या देशात महत्त्वाचे पाऊल टाकले.
सन २००१साली भारत-पाकिस्तानचे संबंध सुदृढ करण्यासाठी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण पाठवले. या दोन पंतप्रधानांची भेट आग्रा येथे झाली व यानंतर लाहोरला जाणारी बस देखील सुरू करण्यात आली. या बसमध्ये वाजपेयी यांनी स्वतः प्रवास केला. परंतु त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यांनी सर्व शिक्षा अभियान सुरू करून देशात शिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. यशस्वी पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर २००४साली एनडीए युती पुन्हा एकदा निवडणुकीत उतरली. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेतृत्वात युपीए या युतीने बहुमत प्राप्त केले व देशात काँग्रेसचे शासन आले. त्याच साली काँग्रेसच्या विजयानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदावरून राजीनामा दिला. सन २००५मध्ये त्यांनी राजनीतीमधून सेवानिवृत्त होण्याची घोषणा केली आणि आणि त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला नाही.
अटल बिहारी वाजपेयींना सन २००९मध्ये पहिल्यांदा हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडत गेले. दि.११ जून २०१८ला त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये भरती करण्यात आले आणि पाच दिवसानंतर- दि.१६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरात सात दिवसाचा राजकीय शोक घोषित केला. या सात दिवसांपर्यंत देशाचा राष्ट्रध्वज अर्धा झुकावण्यात आला. सोबतच केंद्रशासनाच्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली.
!! अटल बिहारी वाजपेयी यांचे पावन पुण्यस्मरण त्यांना विनम्र अभिवादन करून !!

– संकलन –
श्री एन.के.कुमार गुरूजी.
गडचिरोली, फक्त मधुभाष- 7775041086.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here