


सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : सामान्य नागरिकाना सततच्या महत्वाच्या कामासाठी ग्रामपंचायतीत जावे लागते काहीना शासकीय कामासाठी अथवा शैक्षणिक कामासाठी सरपंचाचा दाखला लागतो तर कुणाला घराचा दाखला घेण्यासाठी जावे लागते परंतु घाडगेवाडी,(बारामती )ग्रामपंचायत गेले कित्येक दिवसापासुन नियोजित वेळेत उघडलीच जातं नसल्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत त्यामुले सामान्य नागरिकांना नाहक. मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे बारामती तालुका पदाधिकारी सागर बगाडे यांनी सांगितले घाडगेवाडी या गावात ग्रामपंचायत असून सदर ग्रामपंचायत ही गेली कित्येक दिवसापासुन नियोजित वेळेत उघडली जातं नाही कधी बारा वाजतां उघडली जाते तर कधी दुपारी एक वाजलेनंतर उघडली जात असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना विनाकारन आपल्या कामासाठी आणि दाखळ्या साठी हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे घाडगेवाडीतील नागरिकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे.
या ग्रामपंचायतिच्या अशा नियो जीत वेळेत न उघण्यामूले याची दाद मागायची कोणाकडे कारण सरपंच शरद चव्हान आणि ग्रामसेविका वर्षा सालगुडे हे सतत गैरहजर असतात आणि ग्रामपंचायत दुपारंतर उघडल्यानंतर कर्मचारी आपली कामे करत असतात परंतु सरपंच आणि ग्रामसेविका सतत गैरहजर आसळ्यामुळे नागरिकांना दाखले मिळत नाहीत गावातील वारडातील अडचणीची तक्रार घेतली जातं नाही कोणत्याही प्र कारची कामे होत नाहीत अशा या भोगलं कारभाराविषयीं नागरिकांच्यात तीव्र नाराजी असून दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल नागरिक करत आहेत.
यापुढे ग्रामपंचायत नियोजित वेळेत उघडली गेली नाही आणि नागरिकांची कामे होण्यास विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गरभीत ईशाराच संतप्त नागरिकांनी दिला आहे.
यापुढे सरपंच आणि ग्रामसेविका वारवार गैरहजर राहिल्यास तहसीलदार आणि जिलहा धिकारी याच्याकडे तक्रार करणार असळ्याचे नागरिकांनी सांगितले आणि त्यातूनही काही मार्ग नाही निघाला तर येणार्या काही दिवसात ग्रामपंचातीसमोर सर्व ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचे सागर बगाडे यांनी सांगितले.













